Featured

मित्रानो बियाण्यांची लेबल , विक्री , व बियाणे खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक असते ..

मित्रानो आपण बाजारातून दरवर्षी बी बियाणे खरेदी करतो पण आपण कधी बियाणाला लावलेल्या लेबल चा विचार केला का की हे लेबल आपल्याला काय दर्शवते .

चला तर मंग आज आपण याचं गोष्टीची माहिती घेऊया.

कुठल्याही कंपनीला बीज प्रमाणीकरण केलेल्या बियाच्या पिशव्या भरून त्यास मोहोर लावण्याच्या वेळी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून उत्पादकला पिशवीला लावण्यासाठी लेबल दिले जातात.
लेबल चा रंग -: 

१) निळा

२ ) पांढरा

३ ) पिवळा हे रंग लेबल ला वापरल्या जातात .आकार -: 

लेबल चा आकार हा १५ × ७.५० सेमी इतका असते. 

लेबल वर पिक ,वानाचे नाव ,बियाणाचा वर्ग , लॉट क्रमांक उत्पादकाचे नाव , दिनांक , शुद्ध बियाणे आणी इतर घटकाची टक्केवारी उगवनशक्ती , बियाणेचाचणी बियाणे वापरण्याची शेवटची तारीख असा सर्व तपशील त्या लेबल वर नोंद केलेला असतो . लेबल वर दिलेली सर्व माहिती ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेने बियाची खरेदी केलेल्या ग्राहकास दिलेली एक हमी असते . या बियाणाची विक्री  परवानाधारक विक्रेते , कृषीसेवा केंद्र , शेतकरी गट यांच्या मार्फत होत असते .
शेतकऱ्याने बियाणे विकत घेताना bag ला लावलेले लेबल व त्यावरील वानाची जात ,वापरण्याची तारीख , पिशवीची शिवण ,लेबल मोहोर या सर्व गोष्टी व्येवस्तिथ पाहून घेणे गरजेचे असते. तसेच बियाण्यांची खरेदी बिल घेणे गरजेचे असते . 

बियाणे शेतात पेरताना किंवा लागवड करताना पिशवीच्या वरचे तोंड ,लेबल ,मोहोर तसेच ठेऊन खालच्या बाजून फोडून बियाणं वापरावे , पुढे काही बियाणामध्ये खराबी असल्यास आपल्याला त्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यास पुरावा म्हणून लावावा लागतो . 
बियाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना उत्पादन खर्चात पायाभूत बियाणे किंमत ,मशागत ,पाणी, पिकसवरक्षण  , विलगीकरण ,नरवंध्यत्व ,परागसिंचन ,अशा अनेक गोष्टीचा खर्च धरावा लागते .कोणत्याही कारणाने जर प्लॉट वाया गेला तर उत्पादनात घट येते त्यामुळे सर्व गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते .

बियाण्या संदर्भात कायदेशीर तरतूद -:

भारतीय बियाणे कायदा १९६६ पास झाला होता पण बियाणे संदर्भात कायदा हा १९६९ मध्ये अमलात आला आहे .

हे कायदा नोंदणिक्रत जातीच्या बियाण्यासाठी लागू आहे .

१ ) केंद्रीय बियाणे समिती -:

ही समिती भारत सरकारला बियाणे नोंदणी करणे , बियाणाची गुणवत्त निश्चित करणे ,बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा , बियाणे चाचणी पद्धती व प्रयोगशाळा या गोष्टीवर सल्ला देते .

२ ) केंद्रीय बियाणे प्रमाणीकरण मंडळ -:

वेगवेगळ्या राज्यातील बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेत सुसूत्रता करणे हे या मंडळाचे काम आहे .

३ ) राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा -:

या यंत्रणेकडे नोंदणिक्रत बियाण्याच्या प्राणीकरण करणे ,प्रमाणीकरणाच्या पद्धती निर्माण करणे ,राज्यातील रोपपैदासकाराची नोंद ठेवणे हे काम ह्या मंडळ चे आहे .

४ ) केंद्रीय बियाणे प्रयोग शाळा -:

राज्यातील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेच्या कामात सुसूत्रता ठेवणे व बियाणे चाचणीत एकसारखेपणा ठेवणे हे या मंडळाचे काम आहे .

५ ) राज्य बियाणे परीक्षण प्रयोगशाळा -:

राज्यात तयार होणाऱ्या प्रामाणित बियाण्याचे परीक्षण करणे हे या मंडळाचे काम आहे .

या कायद्याप्रमाणे उत्पादन व प्रमाणीकरण यात निर्माण झालेल्या वादात आपिलाची तरतूद आहे .

मित्रांनो तुम्हाला Agriculture group वरील पोस्ट आवडली  असल्यास कृपया like, shere, comment, करा.

मित्रानो अशाचं नवनवीन पोस्ट आपण वाचकासाठी लेखन करतोय कृपया like, shere, आणि comment करायला विसरू नका.

Residential Ban Status in Maharashtra: Y-marketing of residential ban status in Maharashtra on this issue, industry.

The demand for copies or marketing activities is constantly increasing.  Maharashtra’s residential ban quality Y-market is growing through industrially located Pishvi duplexes, limited importance, and high temperatures from sunrise to sunset.  Subject to laws framed according to industrial issues, this industry is administered by an administration vested in Mudra-Master powers to achieve harmony and justice for the residents.  A form of expectation recognition of the demands that are available in a trade and gain .

Fact: Residential ban status in Maharashtra is Y-market for Chalu and Moozkar residents in Maharashtra.  Y-marketing of this restricted category is the sale or operation of restricted properties.  Residential ban status compared to this status has lower capacity ownership than other statuses and needs to be taken with cash while getting it.  Marketability of this class of assets was also less, although there was an entry into the areas of landing, manufacturing, stamping and marketing of goods, i.e. through financial means.

Also some information on this topic is found in the document found by ordinary citizens:

1. Only in the terms or existing understanding but only up to the extent of the estimated ban from the bonds residing in Maharashtra, the loan sanction has increased by Rs.3 crores.

2. Bandi status in Maharashtra has increased as all post-Maharashtra reserves have been taken from orbit as a joint advance.

3. Prominent businessmen and wives of Deputy Commissioners have got banned status in Maharashtra with a view to entrepreneurship

Friends, if you like the post on Agriculture group, please like, share, comment.

Friends, we are writing new posts for our readers, please don’t forget to like, share and comment.

वातावरण बदल्यास पिकावर कोणकोणते रोग येऊ शकतात याची आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेऊया …!

रोगाचा अंदाज -: रोगजंतू आणि वातावरण या गोष्टीच्या सखोल माहितीच्या आधारे रोगनियंत्रण करणे हे खूप कमी खर्चात होऊ शकतो. काही रोगाच्या बाबतीत नियन्त्रन करणे रोगाच्या पादुर्भावच्या नजीकच्या काळात वाढण्याच्या तसेच पादुर्भाव केव्हा आणी कोठे होता या सर्व बाबी ची पूर्ण माहिती असल्याशिवाय अशा रोगांना नियंत्रण करणे अवघड असते.

१ ) बटाटा चा करपा रोग -:

‘ फायटोप्थोरा इन्फेस्टन्स ‘ या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि कालांतराने रोगात रूपांतर होण्यासाठी दोन ते तीन दिवस १० °  सेल्सियस किंवा त्या पेक्षा जास्त तापमान आणि ७५ ℅ पेक्षा जास्त आदर्ता या दोन बाबी पिकाच्या वाढीसाठी वारवार येने आवश्यक असतात.

२ ) भाताचा तांबडा टिपका -:

” हेल्मिथोस्पोरियम ओरायझी “ या बुरशीमुळे होणारा रोग साठीच्या स्वरूपात यण्यासाठी पिकाच्या वाढीच्या कालावधीत जास्त पाऊस आणि कमी निचऱ्याची जमीन असेल तर हा प्रकार होऊ शकतो..

भाताचा करपा रोग -: ” पायरीक्यूलारिया  ओरायझी “ या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाची साथ येण्यासाठी २५ ते २८ ° इतके तापमान व ७५ ते ८५ ℅ आदर्ता कमी प्रमाणात वारं आणि ढगाळ वातावरण या गोष्टीमुळे हा रोग येऊ शकतो.

वाटाण्याचा भुरी रोग -:

” इरिसायफी पॉलिग्वानि “ या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि साथ येण्यासाठी कोरडे वातावरण २० ते २५ ° अंश सेल्सियस तापमान आणी ४० ते ५० ℅ वातावरणातील आदर्ता असल्यास हा रोग येण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते .
गव्हाचा तांबेरा रोग -: PAKSHINIYA GRAMINIS TRITISAY या बुरशीमुळे होणाऱ्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव व वाढ होण्यासाठी वातावरणातील तापमान २० ते २५ ° अंश सेल्सियस व आदर्ता ५० ते ७० ℅ आणि गव्हावर जास्त प्रमाणात दव असल्यास हा रोग येऊ शकतो .

द्राक्षाचा केवडा रोग -:

” प्लाझमो व्हेक्टिकोला “ या बुरशीमुळ होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वेलीवरिल रोगट पानामध्ये सुप्त् डोळ्यामध्ये असलेल्या लेंगिक बिजामार्फत ज्या वेळी अनुकूल वातावरण निर्माण होते त्या वेळी सुप्त बिजापासून असंख्य आलेंगिक बीजे निर्माण होतात ते बीज निर्माण होण्यास १२ ते १३ ° अंश सेल्सियस तापमान असणे आवशक असते. तसेच पंधरा दिवसाच्या फरकाने पाऊस अधूनमधून पडत राहिल्यास हा रोग झपाट्याने पसरतो

मित्रांनो तुम्हाला Agriculture group वरील पोस्ट आवडली असल्यास कृपया like, shere, comment, करा

मित्रानो अशाचं नवनवीन पोस्ट आपण वाचकासाठी लेखन करतोय कृपया like, shere, आणि comment करायला विसरू नका

मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का पिकावरील कोणकोणते किड नुकसानीचे असतात अन कोणते किड उपयुक्त असतात

पिकावरील नुकसानकारक कीड -:

मित्रानो तुम्हाला हे माहिती आहे का की प्रत्येक पिकाला व पिकावर दोन कीड असतात एक उपयुक्त अन दुसरे नुकसानकारक आपण आज या लेखात हेच पाहणार आहेत की पिकावरील नुकसानकारक किड्याची माहिती

मित्रानो विविध प्रकरचे कीड हे पिकाला घातक असतात तसेच सर्वच कीड पिकावर सगळ्या ठिकाणी येतात असे पण नाही. पण काही ठराविक कीड असे आहेत जे भारतात सगळ्याच ठिकाणी आढळतात भारतात 1960 ला टोळधाड ही कीड आली होती त्या कीड ने शेतकऱ्याचे भरपूर नुकसान केले टोळधाड या किड्याला आपण आंतराष्ट्रीय म्हणू कारण ही की या देशातून त्या देशात जाते  , असे बऱ्याच प्रकारचे कीड आहे जे पिकाला हानिकार आहेत (उदा..)  टोळधाड ,घाटेआळी , कोळी

१ ) -: टोळधाड -: टोळधाड ही आर्थॉप्टरा या श्रेणीतील कीड आहे तसेच ,तसेच ही कीड मोट्या संख्येने एका देशातून दुसऱ्या देशात जाते . ही कीड पिकाचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान करते विशेष ताबूस रंगाच्या टोळधाड ह्या खूप खावड असतात एका टोळधाडीत लाखो टोळधाड असतात त्यामुळे पिकाचे खूप जास्त प्रमाणात आणी कमी कालावधीत पिकाचे ही कीड नुकसान करतात. टोळधाड ही पाकिस्तान मधून राजस्थानच्या वाळवंटी भागात शिरतात आण त्या ठिकाणी त्यांची जास्त प्रमाणात उत्पती होते . तसेच त्याचे नंतर थवे होउन ते थवे राजस्थान ,पंजाब , उत्तर प्रदेश ,गुजरात या ठिकाणी जास्त पसरतात महाराष्ट्रात 1960 सली येऊन गेली परंतु त्या नंतर आजपर्यंत महाराष्ट्रात टोळधाड आली नाही

२) -: घाटेआळी -: यामध्ये या किडीचा प्रकार 1990 -1991 पासून जास्त प्रमाणात दिसून येतोय 1993 व 1998 साली कापूस ,तूर, हरभरा ,इतर पिकावर या आळी चा मोट्या प्रमाणात प्रधुर्भाव होऊन पिकाचे अतोनात नुकसान देखील झाले. दरवर्षी या किडी मुळे हरभरा आणी तूर या पिकाचा जवळजवळ 300 कोटी रुपयांचे नुकसान भारतात होते .

पिकावरील उपयुक्त कीड -:

मधमाशी  -: मधमाशी ही हायमेनॉप्टेरा या श्रेणीतील कीड आहे या मधून शेतकऱ्याला मध व मेन हे पदार्थ मिळतात . माध्यमाशा आणि फुले येणाऱ्या पिकाचा खूप संबंध असते. आपण यांचा जीवनक्रम पाहूया

जीवनक्रम -: माध्यमाशाच्या तिन जाती असतात त्याती 1) मोठी मधमाशी ( एपिस डॉरसेटा ) 2) भारतीय मधमाशी ( एपिस सरांना इंडिका ) 3) छोटी मधमाशी ( एपिस फ्लोरिया )

१) -: मोठी मधमाशी ही साधारण रहदारी पासून उंच जागेवर असतात तिथेच आपली पोळी तयार करतात ही माशी आक्रमक असते. त्यामुळे ह्या माशाचे पालन करणे अवघड जाते

२) -: भारतीय मधमाशी ही आकारने लहान असून याची पोळी लहान आकाराची असते. तसेच या एका ठिकाणी 7 ते 8 पोळी तयार करू शकतात .या माशा आक्रमक नसतात

३) -: छोटी मधमाशी ही आकारने लहान असतात व पोळी देखील लहान आकाराची करतात तसेच ही मधमाशी पालन करण्यासाठी योग्य असते आणी याचे पोळ्यामधून वर्षभरात 10 ते 15 किलो मध मिळू शकतो .

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें